ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

 ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

कासारवाडी येथील राधिका रेसिडेन्सी मधील उपक्रम

प्रचंड प्रमाणात तयार होणाऱ्या कचऱ्याचे विघटन कसं करायचं, आपण फक्त कचरा घराबाहेर टाकून देतो आणि विषय संपतो, जरा पर्यावरणाचा विचार करणे काळाची गरज बनली आहे.

राधिका रेसिडेन्सी कासारवाडी या ठिकाणी ओल्या कचऱ्या पासून खत निर्मिती प्रकल्प १५ नोव्हेंबर २०२० रोजी सुरु केला. 100 किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटी मधील कचरा आता महापालिका उचलणार नाही. या नियमांनुसार ओला कचरा जागेवर जिरवणे बंधनकारक आहे. हा झिरो मेंटेनन्स खत प्रकल्प मॉडेल श्री प्रभाकर तावरे, सहा आरोग्य अधिकारी पिंपरी चिंचवड म न पा यांनी विकसित केला आहे. हा स्वस्त खत प्रकल्प अगदी छोटया जागेत उभारला आहे. या पासून सोसायटीला सेंद्रिय खत मिळेल. त्याचबरोबर सुक्या कचऱ्याचे ५ प्रकारचे अलगीकरण या सोसायटी मध्ये केलें जाते. या सोसायटी मधील श्री अनिल शर्मा यानी स्वतः या प्रकल्पावर खर्च केला आहे. हा प्रकल्प उभारणी साठी जयंत कारिया, सुनिल बेलवलकर अश्या सभासदांनी विशेष प्रयत्न केलें. विशेष सदर प्रकल्प उद्गाटन श्री प्रभाकर तावरे यांनी केलें. प्रशांत राऊळ वृक्ष मित्र हेही हजर होते. तसेच पर्यावरण पूरक झाडें लावण्याचा संकल्प त्यानी केला.प्रत्येक सोसायटीधारकांनी अशाच प्रकारे पुढाकार घेऊन सेंद्रिय खतनिर्मिती करून कचऱ्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. त्यामुळे प्रशासनावर कचरा विघटनाचा ताण येणार नाही आणि पर्यावरणाची हानी टळेल.