२७ जानेवारीपासून राज्यातील पाचवी ते आठवी चे वर्ग सुरु
करोनामुळे गेले दहा महिने बंद असलेल्या इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा येत्या २७ तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी आणि पालकांची संमती घेऊनच शाळा सुरू होतील आणि त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर के ली जातील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी शुक्रवारी जाहीर केले.
पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. नेमके त्याच काळात काही ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढल्याने सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनावर सोपविला होता. यानुसार राज्याच्या काही भागांत शाळा सुरू झाल्या. पण मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या मुंबई महानगर क्षेत्रातील शाळा सुरू झाल्या नाहीत. अद्यापही मुंबई परिसरातील शाळा बंदच आहेत. करोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने तसेच देशाच्या अन्य भागांमध्ये शाळा सुरू झाल्यानेच राज्यातही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता.




Comments (0)
Facebook Comments (0)