दिवाळीनंतर रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते

दिवाळीनंतर रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते

राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी असली तरी दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. कोरोना प्रतिबंधक नियम पाळले नाहीत तर दिवाळीनंतर रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, 'सध्या कोठेही तिसऱया लाटेची सुरुवात नाही. मात्र दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सने तसा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या रुग्णसंख्या कमी झालेली आहे. पॉझिटिव्हीटी दर कमी झालेला आहे. मात्र कोरोना चाचणीसुद्धा कमी केलेल्या नाहीत. ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱया लाटेची तीव्रता कमी झाली आहे. कोरोनामुळे मुंबईत एकाचाही मृत्यू झालेला नाही. हा लसीकरणाचा फायदा आहे. सध्या रुग्णसंख्या कमी झालेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुरू झाली पाहिजे.