अखेर लग्न बंधनात अडकले निल भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा,
बॉलीवूड आणि टीव्ही जगात सध्या लग्नाचा धुमाकूळ सुरू आहे. प्रत्येक स्टार आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधताना दिसत आहे.
अशातच 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत विराट आणि पत्रलेखा म्हणजेच नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्माही लग्नबंधनात अडकले आहेत.
'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत नील आणि ऐश्वर्य शर्मा दीर आणि वहिणीच्या भूमिकेत आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत आहेत. आता दोघेही नव्याने आयुष्याला सुरुवात करणार आहेत. दोघांचा विवाहच्या विधींना उज्जैनमध्ये सुरुवात झाली होती. त्यामुळे कुटुंबीयांची तारांबळ उडाली होती. अशातच आज 1 डिसेंबर रोजी दोघांचा विवाह पार पडला आहे.
29 नोव्हेंबर रोजी नील आणि ऐश्वर्या शर्मा यांचा हळदी समारंभ पार पडला. या दरम्यान कुटुंबीय आणि मित्रांनी ऐश्वर्याला हळद लावली. दोघांचे काही फोटो देखील समोर आले होते. तसेच मेहंदी समारंभाचे देखील फोटो व्हायरल झाले होते.
ऐश्वर्याने लग्नात लाल रंगाचा लेहंगा परिधान केला असून राजवडी दागिणे परिधान केले आहेत. तर निलने पांढऱ्या रंगाचा सलवार कमीज परिधान केला आहे.
या दोघांचं लग्न मोठ्या धुम-धडाक्यात पार पडलं आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)