Shetkari Karjmafi : १६ लाख शेतकरी पात्र, तरीही खात्यात जमा होणार नाहीत कर्जमाफीचे पैसे; सरकारच्या एका निर्णयाने वाढली चिंता!
मुंबई : राज्य सरकारने मोठ्या थाटामाटात जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'च्या अंमलबजावणीत आता मोठा प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. सरकारने आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली असली, तरी ई-केवायसी (e-KYC) न झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणे रखडणार आहे. 'लाडकी बहीण योजने' प्रमाणेच आता कर्जमाफीसाठीही ई-केवायसीची अट कडक करण्यात आल्याने लाखो बळीराजा चिंतेत पडला आहे.
१६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची यादी जाहीर, पण...
महायुती सरकारने राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना तब्बल ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून ५३३ शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीसह या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर शासनाने आणखी १६ लाख ९६ हजार २०१ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर केली.




Comments (0)
Facebook Comments (0)